AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...

ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ…

| Updated on: Aug 19, 2026 | 6:00 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकणी आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात युक्तिवाद केला. यानतंर आता आजच्या सुनावणीवर मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशांबाबत माहिती दिली आहे. संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठी बळकटी मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. कैलास पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सध्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. याच कारणामुळे बहुसंख्य लोकांचा ओढा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाकडे आहे.

आजचे पक्षप्रवेश ही केवळ सुरुवात असून, येत्या काळात आणखी अनेक लोक पक्षात सामील होणार आहेत. लोक स्वतःहून पक्षाशी संपर्क साधत आहेत. हुकूमशाहीच्या विरोधात आणि सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या या पक्षाकडेच लोकांचा जास्त कल असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Published on: Aug 19, 2026 06:00 PM

Follow Us