AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढणार? अंबादास दानवे यांची नेमकी मागणी काय?

अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढणार? अंबादास दानवे यांची नेमकी मागणी काय?

| Updated on: Jul 26, 2023 | 4:30 PM
Share

VIDEO | राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची परिषदेत मोठी मागणी

मुंबई : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून ते लवकरच ४ ऑगस्ट रोजी संपणार आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होऊन गेल्या ७ दिवसांपासून कामकाज सुरू आहे. अशातच राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने विविध आमदारांमार्फत सभागृहात उपस्थित केले जात आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी कमी आणि कामकाज जास्त असल्याने कित्येकदा आमदारांना त्यांच्या प्रश्नांवर बोलता येत नाही तर कधी त्यांना बोलू दिले जात नाही. दरम्यान, सुरू असलेल्या या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषदेत केल्याचे पाहायला मिळाले. तर अंबादास दानवे यांनी केलेल्या या मागणीनंतर विधीमंडळ कामकाज समितीसमोर तुमचे मुद्दे मांडा, असे उत्तर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिलंय.

Published on: Jul 26, 2023 04:30 PM