अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढणार? अंबादास दानवे यांची नेमकी मागणी काय?
VIDEO | राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची परिषदेत मोठी मागणी
मुंबई : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून ते लवकरच ४ ऑगस्ट रोजी संपणार आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होऊन गेल्या ७ दिवसांपासून कामकाज सुरू आहे. अशातच राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने विविध आमदारांमार्फत सभागृहात उपस्थित केले जात आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी कमी आणि कामकाज जास्त असल्याने कित्येकदा आमदारांना त्यांच्या प्रश्नांवर बोलता येत नाही तर कधी त्यांना बोलू दिले जात नाही. दरम्यान, सुरू असलेल्या या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषदेत केल्याचे पाहायला मिळाले. तर अंबादास दानवे यांनी केलेल्या या मागणीनंतर विधीमंडळ कामकाज समितीसमोर तुमचे मुद्दे मांडा, असे उत्तर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिलंय.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?

