AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Fadnavis : नायक चित्रपट ते मोदींचे नेतृत्व... अक्षय कुमारकडून फडणवीसांची मुलाखत, राजकारणातील रिअल हिरो कोण? सवाल करताच म्हणाले....

CM Fadnavis : नायक चित्रपट ते मोदींचे नेतृत्व… अक्षय कुमारकडून फडणवीसांची मुलाखत, राजकारणातील रिअल हिरो कोण? सवाल करताच म्हणाले….

| Updated on: Oct 07, 2025 | 3:10 PM
Share

अक्षय कुमारसोबतच्या संवादात देवेंद्र फडणवीस यांनी नायक चित्रपटाच्या प्रभावावर भाष्य केले. राजकारणातील खरे हिरो म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, भारताची अर्थव्यवस्था फ्रजाइल फाईव्हमधून फर्स्ट फाईव्हमध्ये आणली, आणि २०४७ पर्यंत विकसित भारत साकारण्याचा संकल्प व्यक्त केला.

अक्षय कुमार यांनी एफआयसीसीआय फ्रेम्समध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या संवादात फडणवीस यांनी संत्री खाण्याच्या अनोख्या पद्धतीबद्दल सांगितले. त्यानंतर, त्यांनी नायक या चित्रपटाचा उल्लेख केला, ज्यातील एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्याचे ते म्हणाले.

या मुलाखती दरम्यान, राजकारणातील खऱ्या हिरोबद्दल विचारले असता, फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. त्यांनी नमूद केले की, मोदींनी गेल्या १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. भारताला फ्रजाइल फाईव्ह अर्थव्यवस्थेतून फर्स्ट फाईव्हमध्ये आणले. भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसरी बनेल. तंत्रज्ञान, संरक्षण आणि एव्हीजीसी यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारताची जागतिक स्पर्धा वाढत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे मोदींचे ध्येय असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Published on: Oct 07, 2025 03:10 PM