नवाब मलिक यांची अटक ही दुर्देवी
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांच्या अटकेविषयी बोलताना सांगितले की, त्यांची ही अटक दुर्देवी गोष्ट आहे.
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांच्या अटकेविषयी बोलताना सांगितले की, त्यांची ही अटक दुर्देवी गोष्ट आहे. कित्येक वर्षानंतर जमीन व्यवहाराचा तपास सुरु झाला, किमान तीस वर्षानंतर या प्रकरणाचा तपास करुनही त्यामध्ये नवाब मलिक हे निर्दोष आहेत. या प्रकरणात सलीम नावावरून झालेला गोंधळ झाला तो मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी स्पष्ट करुन सांगितला आहे. नवाब मलिक यांच्यावर केलेले आरोप आणि त्यांना झालेल्या अटकेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी सांगितले. नवाब मलिक वेळोवेळी विरोधकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे विरोधकांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईवर आम्ही शांत बसणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...

