नवाब मलिक यांची अटक ही दुर्देवी
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांच्या अटकेविषयी बोलताना सांगितले की, त्यांची ही अटक दुर्देवी गोष्ट आहे.
अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांच्या अटकेविषयी बोलताना सांगितले की, त्यांची ही अटक दुर्देवी गोष्ट आहे. कित्येक वर्षानंतर जमीन व्यवहाराचा तपास सुरु झाला, किमान तीस वर्षानंतर या प्रकरणाचा तपास करुनही त्यामध्ये नवाब मलिक हे निर्दोष आहेत. या प्रकरणात सलीम नावावरून झालेला गोंधळ झाला तो मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी स्पष्ट करुन सांगितला आहे. नवाब मलिक यांच्यावर केलेले आरोप आणि त्यांना झालेल्या अटकेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी सांगितले. नवाब मलिक वेळोवेळी विरोधकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे विरोधकांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईवर आम्ही शांत बसणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,

