राज्यात मुसळधार पावसाचं थैमान, मात्र ‘या’ जिल्ह्यात पावसानं फिरवली पाठ; बळीराजा चिंतेत
VIDEO | अर्धा पावसाळा संपत आला तरी 'या' जिल्ह्यात पाऊसच नाही, पाऊस नसल्याने शेती पिकांना फटका तर बीड जिल्ह्यात एकूण 136 प्रकल्प आहेत त्यापैकी 40 प्रकल्पात केवळ 15 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक
बीड, ३१ जुलै २०२३ | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या मुसळधार पावसानं काही जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्यातील एका जिल्हात मेघराजानं पाठ फिरवल्याने बळीराजा चिंतेत आहे. राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असतानाच बीडमध्ये मात्र पावसाने दडी मारली आहे. बीड जिल्ह्यात एकूण 136 प्रकल्प आहेत त्यापैकी 40 प्रकल्पात केवळ 15 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर उर्वरित प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अर्धा पावसाळा संपत आला असला तरी अद्याप मुसळधार पावसाचे आगमन बीड जिल्ह्यात झाले नसल्याने येणाऱ्या काळात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने याचा फटका शेती पिकांना देखील बसला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

