AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार

Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार

| Updated on: Jun 19, 2026 | 10:42 PM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडींनंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हे खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडींनंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “ऑपरेशन तुडवा” संदर्भात वक्तव्य करत बंडखोर खासदारांविरोधात आक्रमक इशारा दिला होता. त्यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पलटवार करत “हिम्मत असेल तर समोर या” असे आव्हान दिले.

शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. “काही लोक ऑपरेशन तुडवा म्हणतात, पण प्रत्यक्षात त्यांना ऑपरेशनची समज नाही. ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी त्यांनी मुंबईतील राजकीय घडामोडी आणि 2022 मधील बंडखोरीच्या घटनांचा उल्लेख करत, त्या काळात आलेल्या धमक्यांनाही उत्तर दिले. “आमचे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत आणि ते मैदानात उतरून लढायला तयार आहेत,” असे ते म्हणाले.

शिंदे यांनी पुढे उद्धव ठाकरे गटावरही टीका करत नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. “सेनापतीने घरी बसून लढता येत नाही, समोर येऊन लढावं लागतं,” असे म्हणत त्यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला.

दरम्यान, राज्यातील विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी महायुती सरकारच्या प्रकल्पांचे कौतुक केले. मुंबईतील पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड आणि समृद्धी महामार्ग यांचा उल्लेख करत, जनतेने महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचे कारण विकास असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 19, 2026 10:41 PM

Follow Us