वाहन धारकांनो समृद्धी महामार्गावर जाताय!; आधी वाहन तपासा, अन्यथा ‘या’ कारणामुळे ‘नो एन्ट्री’
वाहन धारकांनो समृद्धी महामार्गावर जाताय तर तुमच्या गाडीचे टायर ओके आहेत का हे आधी तपासा. अन्यथा फक्त टायरच्या कारणामुळे तुम्हाला समृद्धी महामार्गावर जाता येणार नाही
नागपूर : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे येथे आरटीओची तपासणी वाढली आहे. तर महामार्गावर वेगाने वाहन चालवल्यास टायर फूटू शकतो असे काही तज्ज्ञाचे मत होते. त्याप्रमाणे आरटीओ विभागाणे आपला मोर्चा वाहनांकडे वळवत तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत तर वाहन फिट बसत नसेल तर तुम्हाला समृद्धी महामार्गावर जाता येणार नाही. त्यामुळे वाहन धारकांनो समृद्धी महामार्गावर जाताय तर तुमच्या गाडीचे टायर ओके आहेत का हे आधी तपासा. अन्यथा फक्त टायरच्या कारणामुळे तुम्हाला समृद्धी
महामार्गावर जाता येणार नाही. समृद्धी महामार्गावरील अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे टायर फुटणे किंवा टायरशी संबंधित समस्या आहेत. तर आपघात रोखण्यासाठी आरटीओची तपासणी सुरू झाली आहे. मुंबई ते नागपूर असा हा मार्ग असून सध्या शिर्डीपासून नागपूरपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
Published on: Apr 07, 2023 08:25 AM
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
