India vs Pakistan War : भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
India Pakistan War Impact : बिथरलेल्या पाकिस्तानात आता भारताने केलेल्या हल्ल्याचे हादरे राजकीय व्यवस्थेला सुद्धा बसलेले आहेत.
पाकिस्तानचा सैन्यप्रमुख मुनिर विरोधात आता पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तुरुंगात असलेल्या इम्रान खानचे समर्थक आता रस्त्यावर उतरलेले आहेत. मुनिरला हाकला, इम्रान खानची सुटका करा, अशी मागणी आता करण्यात येत आहे. त्यामुळे भारताच्या हल्ल्याचे हादरे आता पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला देखील बसलेले आहेट्. त्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे बिथरला आहे.
दरम्यान, चांदिपुरामध्ये DRDO ने महत्वाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. चांदिपुरामधील DRDOच्या कॅम्पमध्ये आज दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडणार आहे. DIGनं संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीसंदर्भात पत्र पाठवलं आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात आहेत. त्याला भारतीय लष्कर चोख उत्तर देत आहे. त्यानंतर आता सीमेवरील घडामोडींना वेग आलेला आहे.

वैष्णवीकडून 2 वर्षांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक पिऊन...

सासऱ्यानं सूनेच्या छातीवर...मयुरीच्या आईच 7 महिन्यापूर्वी आयोगाला पत्र

नुसता माज, सौंदर्य पाहून पद..चाकणकरांवर करूणा शर्मा भडकल्या दिला इशारा

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 18 खेळाडूंना संधी, कॅप्टन कोण?
