AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!; गुलाबराव पाटील यांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र

तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!; गुलाबराव पाटील यांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र

| Updated on: Apr 04, 2023 | 7:12 AM
Share

Gulabrao Patil on Mahavikas Aghadi : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विकासाचं व्हिजन असावं लागतं. तीन वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे विकास येईल कुठून? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावलाय. कुणी काँग्रेसचा, एक काँग्रेसमधून फुटलेली राष्ट्रवादी, एक शिवसेना… ज्यांची विचारधाराच एक नाही त्यांच्या डोक्यात विकास येऊ शकत नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 04, 2023 07:12 AM