AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीत काही ठिकाणी पैशांचा पाऊस, किशोरी पेडणेकरांचा इशारा कुणीकडे?

बऱ्याचदा दोन पक्षांच्या कार्यक्रमांची तुलना केली जाते. पण जांभोरी मैदानावरची लोकं कंटाळली आहेत. प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली.

दिवाळीत काही ठिकाणी पैशांचा पाऊस, किशोरी पेडणेकरांचा इशारा कुणीकडे?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 24, 2022 | 12:13 PM
Share

मुंबईः राज्यभरात दिवाळीनिमित्त (Diwali) उत्साही वातावरण असताना राजकीय नेतेही यावरून तोंडसुख घेण्याची संधी सोडत नाहीयेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) आजच्या वरळीतील (Worli) भाजपच्या कार्यक्रमाला टार्गेट केलं. आज काही ठिकाणी दिवाळीचा बराच झगमगाट आहे. काही ठिकाणी तर पैशांचा पाऊस पडतोय, असा टोमणा किशोरी पेडणेकरांनी लगावलाय.

भाजपने आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघातील जांभोरी मैदानावर दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलाय. यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘ वरळीत अनेक ठिकाणी दिवाळी पहाट सुरु आहे.

काही ठिकाणी झगमगती दिवाळी पहाट आहे. पैशांचा पाऊस पडतोय. वेगवेगळ्या माध्यमांतून हे सुरु आहे. पण विचार काय तर काहीच नाही….

पाहा किशोरी पेडणेकर काय म्हण्याल्या?

बऱ्याचदा दोन पक्षांच्या कार्यक्रमांची तुलना केली जाते. पण जांभोरी मैदानावरची लोकं कंटाळली आहेत. प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही….

हा केविलवाणा प्रयत्न आहे, असं म्हणायला हरकत नाही. शिंदे गटातील वाचाळवीरांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीदेखील शिवसेनेवर टीका केली. मागील अडीच वर्षात ज्यांनी काहीच केलं नाही, ते आता टीका करत आहेत. शेतकऱ्यांना आम्ही केलेली मदत विरोधकाना खुपतेय, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ज्यांनी अडीच वर्षात कुणाचे अश्रू पुसले नाहीत. जे अडीच वर्षांतून घरातून बाहेर पडले नाहीत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

शिवसेनेवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले, ‘ दोन वर्षे डिलीट करता आली असती तर केली असती. नवीन सरकारने साऱ्या मर्यादा बाजूला केल्या सण साजरे करायला सुरुवात केली आहे.

सध्या दिवाळी आहे. प्रकाशोत्सव आहे.  आम्ही अनेक ठिकाणी दिवाळीचे कार्यक्रम आयोजित करत आहोत. आज रंगशारदा मध्ये सुद्धा सुरमयी सकाळ झाली, अशी माहिती शेलार यांनी दिली.

आशिष शेलार काय म्हणाले पाहा—

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.