कोल्हापूर निवडणुकीचा रणसंग्राम! कलानगरीत कुणाची हवा?
कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील नागरिकांनी आगामी निवडणुकीपूर्वी अनेक प्रश्न मांडले आहेत. रस्ते, पाणी, पार्किंग आणि स्वच्छतेचा अभाव, निधीचा गैरवापर तसेच वाढती महागाई व बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे आहेत. राजकारण्यांवरील नाराजी आणि प्रभावी विकासकामांच्या अपेक्षा यावर जनतेने आपले मत व्यक्त केले.
कोल्हापूरमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडू लागला असताना, सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आले आहेत. “छोटा पुढारी” घनश्याम दरोडे यांनी नागरिकांशी साधलेल्या संवादामधून विकासकामांच्या अभावावर प्रकाश टाकण्यात आला. रस्ते, पाणी, पार्किंग आणि स्वच्छतेच्या समस्या नागरिकांनी प्रामुख्याने मांडल्या. ज्योतिबा आणि महालक्ष्मी मंदिर परिसरातील भाविकांसाठी योग्य सुविधा नसल्याचे दिसून आले. निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात कामे सुरू न झाल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
इचलकरंजीमध्येही रस्ते, पाणीपुरवठा आणि गटार व्यवस्थापन यांसारख्या समस्या कायम आहेत, तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याचे समोर आले. निवडणुकीच्या काळातच राजकारणी जनतेसमोर येतात, अशी भावना अनेक नागरिकांनी बोलून दाखवली. कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार गेल्या काही वर्षांपासून प्रशासकांकडे असल्याने भ्रष्टाचाराचा आरोपही काही नागरिकांनी केला. महागाई आणि वाढती बेरोजगारी हे देखील चिंतेचे विषय आहेत. येत्या निवडणुकीत जनतेने प्रामाणिकपणे मतदान करून विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

