उद्धव ठाकरे यांच्या हातात पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्व द्यायचंय; संजय राऊत यांचं शिवसैनिकांना आवाहन
शिवगर्जना अभियानांतर्गत गडहिंग्लजमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. यात बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पाहा...
कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. “पानगळ झाल्याशिवाय नवीन वसंत फुलत नाही. नवीन वसंत फुलायला सुरुवात झाली आहे. आमदारांना द्यायला 50 खोके आहेत. मात्र महागाई कमी करायला पैसे नाहीत”, असं संजय राऊत म्हणालेत. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना राज्याचं नेतृत्व आपल्याला मिळवून द्यायचा आहे. कोल्हापुरातून गेलेला संदेश राज्यभर जातो हा इतिहास आहे. त्यामुळे पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी संकल्प करूयात, असं राऊत म्हणालेत.
Published on: Mar 01, 2023 03:22 PM
Follow Us
Latest Videos
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन

