…तर आपण बारसूत जाऊया आणि शेतकऱ्यांना वाचवूयात; राजू शेट्टी आक्रमक
Barsu Farmer Andolan : अश्रूधुराचा वापर करत बारसुतील आंदोलकांना पोलिसांनी हटवलं; राजू शेट्टी आक्रमक; म्हणाले...
कोल्हापूर : रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिकांकडून आंदोलन केलं जात आहे. अश्रूधुराचा वापर करत पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी बारसूमधील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. बारसूमध्ये पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असं ते म्हणालेत. शेतकऱ्यांवर बेशुद्ध होईपर्यंत लाठीचार्ज केलाय. लोकशाहीच्या राज्यात आंदोलकांना बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल तर शरम वाटली पाहिजे. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन करतो, आपण रत्नागिरीला जाऊ आणि बारसूमधल्या शेतकऱ्यांना वाचवू. बघू यांच्याकडे गोळ्या किती आहेत. लाठ्या किती आहेत आणि पोलीस किती आहेत ते, असंही राजू शेट्टी म्हणालेत. सरकारनं आता शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी सरकारने दाखवावी, असंही ते म्हणालेत.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

