चंद्रकांत पाटलांच्या पुढाकार वक्तव्यावर; आव्हाडांचं मोठं वक्तव्य
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यासाठी जर आपल्याला वरून आदेश आला तर आपण पुढाकार घेऊ असे ते म्हणाले होते
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाण्यात एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी 40 आमदार आपल्याबरोबर घेत बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आणले. त्यानंतर राज्यात सतत खोके आणि हिंदुत्वावरून टीका होताना दिसत आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच त्यासाठी जर आपल्याला वरून आदेश आला तर आपण पुढाकार घेऊ असे ते म्हणाले होते. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. जर शिंदे आणि ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करून, चांगल्या गोष्टीला आमचं समर्थन आहे. ‘ऑल दि बेस्ट’ असही ते म्हणाले.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

