माहिम कारावईनंतर बावनकुळे म्हणाले, अतिक्रमण काढणे म्हणजे…
राज ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं काही म्हटलं नाही. तसेच अतिक्रमण काढणे म्हणजे तेढ निर्माण करणे होत नाही असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताच याठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच तसेच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकर आणि राज ठाकरे यांचं अभिनंदन केले. तर अशा अनेक गोष्टी असतात की सरकारपर्यंत येत नाही. त्यातील काही राज ठाकरे यांनी सांगितल्या. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ त्या यासंदर्भात कारवाई केली.
सांगलीतही तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असं आहे. नागपूरातंही एका डीपी रोडवर अतिक्रमण झालंय. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे तिथे कारवाई व्हावी, ते कुठल्याही धर्माचं असोत. मंदिर असोत की मस्जीद. तर राज ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं काही म्हटलं नाही. तसेच अतिक्रमण काढणे म्हणजे तेढ निर्माण करणे होत नाही असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
