बारसू रिफायनरीवरून मुख्यमंत्र्यांची डोळेझाक; राऊत यांची शिंदेवर टीका, काय केली मागणी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणावरही लाठीचार्ज झाला नाही असे सांगत आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) हे बारसूमध्ये रिफायनरीवरून चांगलेच तापलेलं दिसत आहे. बारसूमध्ये रिफायनरीचा (Barsu Refinery) विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यावर पोलीसांकडून लाठीचार्ज केला जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. यावरून ठाकरे गट आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कोणावरही लाठीचार्ज झाला नाही असे सांगत आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्या रत्नागिरीतील जिल्हाधिकाऱ्याला हटवा, अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांची प्रशासनावरती अजिबात पकड नाही. ते डोळेझाक करत आहेत. त्यांना अधिकारी फसवतात, खोटी माहिती देत आहेत असा घणाघात केला आहे. तर हा सर्व खटाटोप फक्त एका इस्लामिक ऑईल रिफायनरीसाठी केला जात असून मराठी माणसावर हल्ला हे सरकार करतंय, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
Published on: Apr 29, 2023 11:56 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
