AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahendra Dalvi : इथली बॅग भरली आता गल्ली टू दिल्ली...कमळाच्या दिशेनं वारी... सुनील तटकरेंवर कोणाचा निशाणा?

Mahendra Dalvi : इथली बॅग भरली आता गल्ली टू दिल्ली…कमळाच्या दिशेनं वारी… सुनील तटकरेंवर कोणाचा निशाणा?

| Updated on: Nov 21, 2025 | 4:29 PM
Share

महेंद्र दळवी यांनी रोहा येथील पक्षप्रवेश सोहळ्यात सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण होत असून लोक कंटाळले असल्याचा दावा त्यांनी केला. सिंचन घोटाळ्यापासून अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करत, "इकडची बॅग भरली गल्ली टू दिल्ली, आता कमळाकडे वाट पकडली" असे म्हणत दळवींनी तटकरे यांच्यावर निष्ठा बदलल्याचा आरोप केला.

रायगड जिल्ह्यातील रोहा येथील खारी पंचायतीच्या गुरूनगर परिसरात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरतशेठजी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती खालावत चालली असून लोक त्यांच्यापासून कंटाळले असल्याचा दावा केला. दळवी यांनी सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करत, भ्रष्टाचारावरून टीका केली. त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता, इकडची बॅग भरली गल्ली टू दिल्ली, आता कमळाकडे वाट पकडली आहे, असे म्हणत निष्ठा बदलल्याचा आरोप केला.

दळवी म्हणाले की, ज्या नेत्याने अनेकांना फसवले, वरिष्ठांचा आदर केला नाही आणि ज्यांच्यामुळे रोह्याचे नाव बदनाम झाले आहे, अशा व्यक्तींना आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी स्वतःला मनातले शेठ संबोधत, प्रामाणिक आणि जनसंपर्कात राहणाऱ्या नेतृत्वाची गरज व्यक्त केली. रोहा, अलिबाग, मुरुडमध्ये बदल घडवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे दळवी यांनी नमूद केले.

Published on: Nov 21, 2025 04:29 PM