AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… ही दादागिरी, किती दिवस अन्याय सहन करणार? मनोज जरांगे पाटील भडकले

| Updated on: Jan 11, 2024 | 5:52 PM
Share

नोंदी सापडल्या असतानाही आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आम्ही सर्व समाजाचे सर्व समावेशक नेते समजायचं कसं असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतानाही जर तुम्ही म्हणताय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तर ही दादागिरी झाली, असेही त्यांनी म्हटले

छत्रपती संभाजीनगर, ११ जानेवारी २०२४ : मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतानाही आरक्षणाला विरोध केला जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केलाय. नोंदी सापडल्या असतानाही आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना आम्ही सर्व समाजाचे सर्व समावेशक नेते समजायचं कसं असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असतानाही जर तुम्ही म्हणताय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तर ही दादागिरी झाली, असे म्हणत आम्ही मराठा समाज कुणबी समाजातून आरक्षण घेऊच, किती दिवस अन्याय सहन करणार? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा निर्धार व्यक्त केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, अहवालाबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही. तर मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण हवे आहे. मराठा समाजाला सरसकट टिकणारं आरक्षण हवं आहे. आम्ही मराठा आरक्षण कधीच नाकारलं नाही ते टिकणारं आरक्षण हवंय इतकीच आमची मागणी आहे. ते नाही तर २० जानेवारीला आम्ही मुंबईत धडकणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

Published on: Jan 11, 2024 05:52 PM