Manoj Jarange Patil : तर 9 वाजेपर्यंत तुम्हाला…; मनोज जरांगेंनी सरकारला दिला शब्द!
मनोज जारंगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारला अल्टीमेटम दिले आहे. अंबल बजावणी आणि जीआर मिळाल्यास आंदोलन मागे घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाहीतर, मुंबई शहरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान सरकारला स्पष्ट इशारा दिला. ते म्हणाले, “जर सरकारने आमच्या मागण्या मान्य करून तातडीने जीआर काढला, तर आज रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडतील.”
जरांगे पुढे म्हणाले, “तुमच्या ताकदीमुळे आम्ही जिंकलो आहोत. मागण्या मान्य झाल्या की, सर्व मराठे आनंदाने मुंबईबाहेर पडतील. एका तासात सर्व जीआर काढून आमच्याकडे घेऊन या, त्यानंतर आम्ही अंतिम निर्णय जाहीर करू.” त्यांनी सरकारला तीन स्वतंत्र जीआर काढण्याची मागणी केली: सातारा गॅझेटियरसाठी एक, हैदराबाद गॅझेटियरसाठी दुसरा आणि इतर मागण्यांसाठी तिसरा जीआर. जर सर्व काही सुरळीत झाले, तर रात्री 9 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई मोकळी करतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

