‘भाजप नेत्यांवर विश्वास नसल्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्र्याना भेटले’, कुणी लगावला खोचक टोला
VIDEO | भाजपच्या मंत्र्यांचा भाजपच्याच मंत्र्यांवर विश्वास नसल्यास विरोधक आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? वैभव नाईक यांचा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सवाल
सिंधुदुर्ग, १६ ऑगस्ट २०२३ | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीवर आमदार वैभव नाईक यांनी टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर विश्वास नसल्यामुळे आणि आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठीच राणे यांनी मुंबई महार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असा उपरोधक टोला ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना लागवला आहे. त्यासोबतच भाजपच्या मंत्र्यांचा भाजपच्याच मंत्र्यांवर विश्वास नसल्यास विरोधक आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवावा का? असा सवालही नारायण राणे यांना वैभव नाईक यांनी केला आहे. तर याबाबत नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा

