AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : गाफील राहू नका, तर... राहुल गांधींनंतर राज ठाकरेंचा व्होट चोरीचा आरोप, पदाधिकाऱ्यांना सूचना काय?

Raj Thackeray : गाफील राहू नका, तर… राहुल गांधींनंतर राज ठाकरेंचा व्होट चोरीचा आरोप, पदाधिकाऱ्यांना सूचना काय?

| Updated on: Sep 20, 2025 | 11:39 AM
Share

राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे मतदार यादीत गडबड असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांना अनुसरून राज ठाकरे यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादींचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचे आवाहन केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे एका सभेत पुन्हा एकदा वोट चोरीचा आरोप केला आहे. हा आरोप राहुल गांधी यांनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपांना दुजोरा देत असल्याचे पाहायला मिळतंय. राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीत सतर्क राहण्याचे आणि मतदार याद्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रत्येक मतदार यादीवर दोन बीएलओ नेमण्याचे आणि गट अध्यक्षांना याची जबाबदारी सोपवण्याचे सुचवले. कार्यकर्त्यांना मतदार यादींबद्दल प्रशिक्षण देण्याचाही विचार आहे. महाराष्ट्रातील नवीन मतदार यादीमध्ये 14 लाख 71 हजार नवे मतदार समाविष्ट झाले असून 4 लाख 9 हजार मतदार वगळण्यात आले आहेत. ठाणे, मुंबई आणि पुणे जिल्ह्यात नवीन मतदारांची सर्वाधिक वाढ झाली आहे.

Published on: Sep 20, 2025 11:37 AM