Raj Thackeray : साधूंच्या नवानं संधीसाधूपणा… उद्योगपतींचे दलाल… संघर्षाची भूमिका घेतल्यास जनतेसोबत मनसे… सरकारला राज ठाकरेंनी घेरलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला. या संघर्षात मनसे जनतेसोबत असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीवरून राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी झाडे तोडली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, “सरकारनं साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नये.” कुंभमेळ्यासाठी झाडे तोडण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर सरकारकडे दुसरीकडे पाचपट झाडे लावायला जागा असेल, तर तिकडेच साधुग्राम उभारावे असे आवाहनही त्यांनी केले.
राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर “उद्योगपतींचे दलाल” म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. भविष्यातील निवडणुकांनंतरही वृक्षतोडीला आपला विरोध कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने उगाच संघर्ष वाढवू नये, जनतेच्या भावनांचा आदर करावा, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारने संघर्षाची भूमिका घेतल्यास मनसे जनतेच्या बरोबर या लढ्यात असेल, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

