AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत

ठाकरेंना अखेर कळलं… या रेड्याने तोंड उघडले तर… बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत

| Updated on: Aug 21, 2026 | 4:39 PM
Share

वैभव नाईकांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेते निलेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी नाईक यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर जोरदार हल्ला चढवला. नाईक यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी काँग्रेस सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्याच्या भूमिकेवरही राणे यांनी टीका केली. तसेच शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीवरही त्यांनी भाष्य केले.

सिंधुदुर्गातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाईक यांच्या शिंदे गटाकडून ऑफर होती या विधानाला राणे यांनी अदखलपात्र संबोधत त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “तू बाजारात बसलायस तर लोक तुझा भाव विचारणार”, असे म्हणत राणे यांनी नाईक यांच्यावर टीका केली. राणे यांनी वैभव नाईक यांच्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळावरही टीका केली, “तू सभागृहात कोकणासाठी काय केलेस?” असा सवाल त्यांनी केला.

राणे यांनी नाईक यांना लाभार्थी संबोधत रवींद्र चव्हाण यांनी त्यांना केलेल्या मदतीची आठवण करून दिली. तसेच, नाईक हे मूळचे काँग्रेसचे असून, त्यांनी काँग्रेस सोडून निष्ठा शिकवू नये, असेही राणे म्हणाले. शिवसेना पक्षचिन्हाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल बोलताना राणे यांनी न्यायप्रविष्ट बाब असल्याने अधिक बोलणे टाळले. मात्र, कपिल सिब्बल यांनी मांडलेले युक्तिवाद कमकुवत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. “उद्धव ठाकरेंना कळले हा रेडा काही कामाचा नाही, तोंड उघडले तर घाण करणार”, असे म्हणत राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर थेट हल्ला चढवला.

Published on: Aug 21, 2026 04:39 PM

Follow Us