… ही कोणती धडपड? नवाब मलिक यांच्यावरून राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना चिमटे
नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यावरून फडणवीसांना घेरणं अद्याप सुरूच आहे. संजय राऊत यांनी मलिक आणि पटेल यांच्यासाठी देशभक्तीची व्याख्या वेगळी आहे का ? असा संजय राऊत यांचा सवाल
मुंबई, १० डिसेंबर २०२३ : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यावरून फडणवीसांना घेरणं अद्याप सुरूच आहे. संजय राऊत यांनी मलिक आणि पटेल यांच्यासाठी देशभक्तीची व्याख्या वेगळी आहे का ? असा सवाल त्यांनी केला तर यावरूनच राज ठाकरे यांनी ट्वीट करून फडणवीस यांना डिवचलं आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा आहे. असे म्हणत मलिकांवर देशद्रोहासंबंधित आरोप असल्यामुळे त्यांना महायुतीत घेता येणार नाही. अशी भूमिका फडणवीसांनी घेतली. यानंतर संजय राऊत यांनी महायुतीतील नेत्यांवरच बोट ठेवत हल्लाबोल केलाय. तर राऊत यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दिशा सालियान प्रकरणात अटकेच्या भितीमुळे आदित्य ठाकरे देश सोडून पळाले अशी टीका नितेश राणे यांनी केली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांना चिमचे काढले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

