AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : तरीही महाराष्ट्रात सन्नाटा होता! पदाधिकारी मेळाव्यातून राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray : तरीही महाराष्ट्रात सन्नाटा होता! पदाधिकारी मेळाव्यातून राज ठाकरे कडाडले

| Updated on: Oct 19, 2025 | 12:55 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर प्रकाश टाकला. मतदार याद्यांमध्ये अनेक वर्षांपासून घोळ सुरू असून, महाराष्ट्रात ९६ लाख बनावट मतदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये हे मतदार घुसडण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच एका तातडीच्या मेळाव्यात निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि विशेषतः मतदार याद्यांमधील गोंधळावर चिंता व्यक्त केली. हा मुद्दा आजचा नसून गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. २०१६-१७ मध्येही आपण मतदान यंत्रे आणि मतदार याद्यांमधील त्रुटींवर आवाज उठवला होता, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तेव्हा अनेकांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, परंतु आता परिस्थिती स्पष्ट होत आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

राज ठाकरे यांनी दावा केला की, विधानसभेच्या मागील निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील मतदार यादीत सुमारे ९६ लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. मुंबईत ८ ते १० लाख, ठाण्यात ८ ते ८.५ लाख, तसेच पुणे आणि नाशिकमध्येही मोठ्या संख्येने असे मतदार भरले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक पक्षांना कमकुवत करून मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी अधोरेखित केले.

Published on: Oct 19, 2025 12:55 PM