Ramdas Kadam : बाळासाहेब गेल्यानंतर मला दसरा मेळाव्यात कुठं बसवलं? भाषण का करू दिलं नाही? कदमांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपल्याला दसरा मेळाव्यात बोलू दिले नसल्याची खंत व्यक्त केली. २०१९ मध्ये मंत्रीपद देतानाही नाइलाज होता, तसेच दिवाकर रावते आणि आपल्यासारख्या निष्ठावंतांना बाजूला सारून अपक्षांना महत्त्व दिल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपल्याला दसरा मेळाव्यात बोलू न दिल्याबद्दल तसेच पक्षात आलेल्या अनुभवांबद्दल खंत व्यक्त केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाळासाहेब जिवंत असताना त्यांना प्रत्येक मेळाव्यात बोलण्याची संधी मिळत होती, परंतु त्यांच्या निधनानंतर एकाही दसरा मेळाव्यात त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप कदम यांनी केला.
२०१४ मध्ये नाइलाजाने मंत्रीपद दिले गेले असे सांगत, पर्यावरण खात्यासारखे दुर्लक्षित खाते दिल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यांनी या खात्यात अभ्यास करून प्लास्टिक बंदीसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, असे नमूद केले. कदम यांनी दिवाकर रावते यांच्यासह अनेक निष्ठावंतांना बाजूला सारून अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली. अनिल परब यांच्या कथित वाढत्या प्रभावावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....

