Ratnagiri Fish Price Hike: माशांचे वाढलेले दर खवय्यांच्या खिशाला कात्री, कारण नेमकं काय?
रत्नागिरीत गेल्या आठ दिवसांपासून समुद्रातील वादळसदृश्य परिस्थितीमुळे मासेमारी थांबली आहे. याचा थेट परिणाम माशांच्या दरांवर झाला असून, ते जवळपास दुप्पट झाले आहेत. रविवार असूनही खवय्यांना मोठ्या किमतींना मासे खरेदी करावे लागत आहेत, ज्यामुळे त्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.
रत्नागिरीत समुद्रातील वादळसदृश्य परिस्थितीमुळे मासेमारी क्षेत्रावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून मासेमारीसाठी बोटी समुद्रात न गेल्यामुळे मच्छी बाजारात माशांची आवक घटली आहे. याचा थेट परिणाम म्हणून सर्वच प्रकारच्या माशांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. साधारणपणे मोठ्या प्रमाणात माशांची आवक होणाऱ्या मच्छी मार्केट परिसरात सध्या दर कडाडलेले दिसून येत आहेत. आज रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने खवय्ये मासे खरेदीसाठी आले होते, परंतु वाढलेल्या दरांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. माशांचे वाढलेले दर खवय्यांच्या खिशाला कात्री लावत आहेत.
Published on: Oct 26, 2025 02:57 PM
Follow Us
Latest Videos
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
