…..म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा
राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे उमेदवार बाळा माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्गही सुकर झाला आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे उमेदवार बाळा माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्गही सुकर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट करत महायुतीतील अंतर्गत तडजोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोकणातील शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते सुनील तटकरे यांच्या उमेदवारीविरोधात होते, हे सर्वश्रुत असल्याचे सांगत रोहित पवार यांनी आता अचानक विरोध मावळल्यामागे राजकीय तडजोड झाल्याचा दावा केला.
“कोकणातील एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते यापूर्वी सुनील तटकरे यांच्यावर टीका करत होते. ते पक्षाला अडचणीत आणतात, असे म्हणत होते. मात्र आता त्यांचा विरोध अचानक शांत झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पालकमंत्रिपद किंवा अन्य राजकीय समीकरणांवर तडजोड झाली असावी,” असा दावा रोहित पवार यांनी केला.
यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. “जर काही जण आजही सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेवत असतील, तर ते वेगळ्याच स्वप्नात आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांनी इतर पक्षांमध्ये लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे, अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. “तुम्ही जिथे चुकणार, तिथे आम्ही बोलणारच. तुम्ही म्हणता खूप कष्ट घेतले, पण खरोखरच कष्ट घेतले असते तर कोकणात घड्याळाची वाताहात झाली नसती. तुम्ही कोकणात लक्ष घातल्यापासून पक्षापेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा अधिक विचार केला. त्यामुळेच पक्षाचे मोठे नुकसान झाले,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असून, कोकणातील राजकीय समीकरणांवरून नव्या चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
Published on: Jun 05, 2026 04:47 PM
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...

