Raj Thackeray : राज ठाकरे यांनी टोलवरून राजकीय स्टंटबाजी करू नये, कुणाची सडकून टीका?
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलनाके जाळण्याचा इशारा दिला होता. यावरून आता आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी टोलवरून राजकीय स्टंटबाजी करू नये, असे म्हणत त्यांनी दिलं आव्हान
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपूर्वी टोलच्या दरवाढीच्या मुद्द्यांवरून मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण करत टोलच्या मु्द्दयावर आक्रमक भूमिका घेतली तर यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलनाके जाळण्याचा इशारा दिला होता. यावरून आता आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी टोलवरून राजकीय स्टंटबाजी करू नये, असे म्हणत त्यांनी आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, जसं ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक टोलसाठी पैसे भरावे लागणार आहेत. तसंच आपण महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी नाशिक मार्गे आणि पुणे मार्गे जे नागरिक आहेत यांना सुद्धा तीन जागी टोल भरावा लागत आहे. आपण यासाठी सुद्धा जर मागणी केली असती तर या नागरिकांनासुद्धा एकच टोल भरावा लागाला असता, असे सचिन खरात म्हणाले.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

