सुनील शेट्टी म्हणतो, टोमॅटो खाणं कमी केलं; सदाभाऊ खोत भडकले अन् म्हणाले, “जागतिक भिकारी…”
टॉमेटोचे दर तर दीडशेच्यावर गेल्याने ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. अभिनेता सुनिल शेट्टी यांने देखील "सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे," असं म्हटलं. त्याच्या या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. टॉमेटोचे दर तर दीडशेच्यावर गेल्याने ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. अभिनेता सुनिल शेट्टी यांने देखील “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही,” असं वक्तव्य केलं होतं.या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा आहे. तो जागतिक भिकारी आहे. शेतकऱ्याला कधीतरी चांगला दर मिळाला तर तुमच्या सारख्या जागतिक भिकाऱ्याच्या पोटात दुखतं. सुनील शेट्टी तुम्ही बाजारू कलावंत आहात. सुनील शेट्टी भीक मागायला आला तर त्याच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका,” असं सदाभाऊ खोत म्हणाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

