AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सुनिल शेट्टी चिंताग्रस्त, सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कटोरा घेऊन दारी आला तर…’

Sadabhu Khot controversial statement on tomato prices : मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोची चर्चा चांगलीचं रंगली आहे. विशेष म्हणजे टोमॅटो महाग झाल्यामुळे अभिनेता सुनिल शेट्टी याने एक वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार नेते सदाभाऊ खोत यांनी घेतला आहे.

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सुनिल शेट्टी चिंताग्रस्त, सदाभाऊ खोत म्हणाले, 'कटोरा घेऊन दारी आला तर...'
Sadabhu Khot controversial statement on tomato pricesImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 14, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक परेशान झाले आहेत. टोमॅटोचा दर (tomato prices) दीडशे ते दोनशे रुपये झाल्यामुळे अनेकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर टोमॅटोची अधिक चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर काही मीस्म सुध्दा व्हायरल झाले आहेत. काल सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांनी केलेल्या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी मराठी अभिनेत्याने देखील टोमॅटोच्या बाबत एक वादग्रस्त फोटो शेअर केला होता. त्याचा सुध्दा खोत यांनी चांगलाचं समाचार घेतला. त्यानंतर त्या अभिनेत्याने आपलं पोस्टर त्यांच्या सोशल मीडियावरुन हटवलं होतं.

अवकाळी पाऊस, मान्सूनचं उशिरा आगमन यामुळे पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. सामान्य नागरिक वाढलेल्या दरांमुळे अधिक परेशान झाला आहे. टोमॅटो दर इतके वाढले आहेत की, केंद्र सरकार आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातून टोमॅटो खरेदी करणार आहे.

काल बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याने एक वक्तव्य केलं होतं. “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही असं वक्तव्य सुनिल शेट्टी याने केलं होतं.” या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

काल ज्यावेळी सुनिल शेट्टी यांनी वक्तव्य केलं, त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती अधिक लोकांनी टीका केली. देशातील इतर महागाई दिसत नाही का ? त्यावर सुध्दा बोलत जा असा नाराजीचा सूर पाहायला मिळाला.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की, जेवणात टोमॅटो खाल्ला नाही म्हणून कोणाचा मृत्यू झाला आहे का ? इतर पालेभाज्या आहेत त्या खा ? काही दिवसात सगळ्या पालेभाज्यांचे दर उतरतील असंही खोत म्हणाले.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.