AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सुनिल शेट्टी चिंताग्रस्त, सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कटोरा घेऊन दारी आला तर…’

Sadabhu Khot controversial statement on tomato prices : मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोची चर्चा चांगलीचं रंगली आहे. विशेष म्हणजे टोमॅटो महाग झाल्यामुळे अभिनेता सुनिल शेट्टी याने एक वक्तव्य केलं होतं. त्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार नेते सदाभाऊ खोत यांनी घेतला आहे.

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सुनिल शेट्टी चिंताग्रस्त, सदाभाऊ खोत म्हणाले, 'कटोरा घेऊन दारी आला तर...'
Sadabhu Khot controversial statement on tomato pricesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2023 | 9:58 AM
Share

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक परेशान झाले आहेत. टोमॅटोचा दर (tomato prices) दीडशे ते दोनशे रुपये झाल्यामुळे अनेकांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर टोमॅटोची अधिक चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर काही मीस्म सुध्दा व्हायरल झाले आहेत. काल सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांनी केलेल्या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी मराठी अभिनेत्याने देखील टोमॅटोच्या बाबत एक वादग्रस्त फोटो शेअर केला होता. त्याचा सुध्दा खोत यांनी चांगलाचं समाचार घेतला. त्यानंतर त्या अभिनेत्याने आपलं पोस्टर त्यांच्या सोशल मीडियावरुन हटवलं होतं.

अवकाळी पाऊस, मान्सूनचं उशिरा आगमन यामुळे पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. सामान्य नागरिक वाढलेल्या दरांमुळे अधिक परेशान झाला आहे. टोमॅटो दर इतके वाढले आहेत की, केंद्र सरकार आता महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातून टोमॅटो खरेदी करणार आहे.

काल बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याने एक वक्तव्य केलं होतं. “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही असं वक्तव्य सुनिल शेट्टी याने केलं होतं.” या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई ..’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

काल ज्यावेळी सुनिल शेट्टी यांनी वक्तव्य केलं, त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती अधिक लोकांनी टीका केली. देशातील इतर महागाई दिसत नाही का ? त्यावर सुध्दा बोलत जा असा नाराजीचा सूर पाहायला मिळाला.

एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की, जेवणात टोमॅटो खाल्ला नाही म्हणून कोणाचा मृत्यू झाला आहे का ? इतर पालेभाज्या आहेत त्या खा ? काही दिवसात सगळ्या पालेभाज्यांचे दर उतरतील असंही खोत म्हणाले.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.