AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

... तर तुम्हाला मिरची का झोंबली? संदीप देशपांडेंचा खोचक प्रश्न

… तर तुम्हाला मिरची का झोंबली? संदीप देशपांडेंचा खोचक प्रश्न

| Updated on: Jan 13, 2026 | 1:26 PM
Share

राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अदानींनी भाजपच्या नेत्यांना वकीलपत्र दिले आहे का, असा सवाल त्यांनी केला. तसेच, उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका ठेवून होणाऱ्या बिझनेस टेकओव्हरला आपला विरोध असल्याचेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) गौतम अदानी यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर भाजपला मिरच्या का झोंबल्या, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. गौतम अदानी यांनी भाजपच्या लोकांना वकीलपत्र दिले आहे का, असेही त्यांनी विचारले.

भाजपमध्ये अनेक वकील असले तरी, अदानींनी या सगळ्यांनाच वकीलपत्र दिले आहे की काय, असा उपरोधिक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका ठेवून बिझनेस टेकओव्हर केले जात असल्याच्या गोष्टीला आपला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात अदानी आणि भाजप यांच्यातील संबंधांवर नव्याने लक्ष वेधले गेले आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत, देशपांडे यांनी भाजपच्या त्वरित प्रतिसादावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Published on: Jan 13, 2026 01:26 PM