फडणवीस शाकाहारी आहेत का? राऊतांचा खोचक सवाल
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांच्या "मते कुठे गेली?" या प्रश्नावरून संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र प्रहार केला. त्यांनी भाजपवर मतदानात घोटाळा केल्याचा आरोप केला आणि महायुती सरकारवर पैसे देऊन मते विकत घेतल्याचा आरोप केला. राऊत यांनी भाजपच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवरही टीका केली आणि मांसाहार महागाईबाबत भाजपवर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “मते कुठे गेली?” असा सवाल उपस्थित केला होता. हा प्रश्न सर्व विरोधी पक्षांनीही विचारला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की, “या प्रश्नाचे गांभीर्य समजून घ्यावे लागेल. फडणवीस यांच्या गटातील लोक जनतेने आम्हाला कौल दिल्याचे सांगतात, पण हे खोटे आहे. जनतेने त्यांना कौल दिलेला नाही, त्यांनी मते चोरली आहेत.”
राऊत पुढे म्हणाले, “भाजपने पाकिस्तानसमोर पैशासाठी शेपूट घातले आहे. तुम्ही कोणाची पाठराखण करत आहात? भाजप ही खोटेपणाची कंपनी आहे. जुने मुद्दे उकरून काढून स्वतःचे बोला सांभाळतात. बोगस ‘लाडके भाऊ’ आणि ‘लाडकी बहीण’ यांना पैसे देऊन महायुती सरकारने मते विकत घेतली आहेत.” त्यांनी मांसाहार बंदीवरही टीका केली, “महाराष्ट्रात मटण खाण्यास बंदी आहे का? भाजपला फक्त टीका करायची सवय आहे. कोणी काय खावे, हे कोण ठरवणार? फडणवीस शाकाहारी आहेत का? आम्हाला माहीत आहे ते काय खातात. मटण-चिकन महाग झाले याला आम्ही कारण नाही, तर जे कालपर्यंत खात नव्हते ते आता रांगा लावून खात आहेत, म्हणून महागाई वाढली आहे.”
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?

