Navnath ban | राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले, जोरदार पलटवार, म्हणाले आधी तुम्ही पाकिस्तानची दलाली…
आखाती देशातील युद्ध आज जवळपास ४० दिवसांनी थांबलं आहे. यावर सकाळीच संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलं होतं यावर भाजपच्या नवनाथ बन यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय.
गेल्या 38 दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत एक दिलासादायक माहिती म्हणजे. लवकरच युद्ध थांबणार आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाची घोषणा केली असून इरणनेही करारास सहमती दर्शवली आहे. यावर तुमचं मत काय विचारताच संजय राऊतांनी स्पष्ट मत मांडलं. तसेच तयांनी परराष्ट्र मंत्री यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनीही जोरदार टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, एस जयशंकरांनी पाकिस्तानचा उल्लेख दलाल राष्ट्र म्हणून केला, पण आता त्याच दलाल राष्ट्राला ट्रम्पने युद्ध थांबवण्याचं श्रेय दिलं.म्हणून सर्वात आधी एस. जयशंकरांनी राजिनामा द्यावा. यावर नवनाथ बन म्हणाले, राऊत कधी राहुल गांधींची दलाली करतात, कधी शरद पवरांची दलाली करावी आज तर त्यांनी चक्क पाकिस्तानची दलाली करण्याचं काम केलं आहे.’ पुढे नवनाथ बन, ‘राऊतांनी दलाली बंद करावी असंही सांगितलं.’
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती

