Sanjay Raut | ‘बंगाल आणखी पेटलं पाहिजे, हिच मानसिकाता…’ संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
नुकतीच उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी टीव्हीके पक्षाबाबत मत मांडले. इतकेच नाही, तर सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येबाबतही रोखठोक मत मांडले.
नुकतीच उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी टीव्हीके पक्षाबाबत मत मांडले. इतकेच नाही, तर सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येबाबतही रोखठोक मत मांडले.
अलीकडेच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यानंतर बंगालमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ आणि राडे सुरू झाले होते. यादरम्यान भाजप पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार असताना एक धक्कादायक घटना घडली. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याविषयी विचारताच, संजय राऊत म्हणाले, “बंगालमध्ये राजकीय वाद भडकला पाहिजे, त्या झळांमध्ये संपूर्ण देश पेटला पाहिजे, हीच भाजपची भूमिका आहे. जर हिंसा पेटली नाही तर ते निवडणूका कसे जिकंतील”
संजय राऊतांनी पुढे ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाला यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर नाही मोदींच्या खोटारडेपणाला एक वर्ष पूर्ण झाला आहे’
'बंगाल आणखी पेटलं पाहिजे, हिच मानसिकाता...' संजय राऊतांचा भाजपवर हल्ला
भाजप अॅक्शन मोडमध्ये; नगरसेवकांनी पक्षशिस्त न पाळल्यास निधीला कात्री
पुन्हा पंजाबमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसशी संबंधित लोक..
बापच बनला हैवान! अल्पवयीन मुलीवर वडिलांसह मामा, मामेभावाने नको ते केलं

