माझे कार्यकर्ते रात्रीपासून झोपले नाहीत, पण एका शब्दाखातर… हल्ल्यानंतर सकाळी काय म्हणाले संतोष बांगर?
कालच्या हल्ल्यानंतर माझे कार्यकर्ते रात्रभर झोपलेले नाहीत. पण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर आम्ही शांत आहोत, असं वक्तव्य बांगर यांनी केलंय.
मुंबईः संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या गाडीवर काल अमरावतीत (Amravati) हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावरून बांगर चांगलेच संतापले आहेत. या हल्ल्यावरून संतोष बांगर यांनी कालच आव्हान दिलंय. हे असे प्रकार चोट्टे लोक करतात. संतोष बांगरवर हल्ला करायला वाघाचं काळीज लागतं. चोरासारखा हल्ला करणारे शिवसैनिक (Shivsainik) कसले? डाका काय असतो माहिती आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसंच कालच्या हल्ल्यानंतर माझे कार्यकर्ते रात्रभर झोपलेले नाहीत. पण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर आम्ही शांत आहोत, असं वक्तव्य बांगर यांनी केलंय.
Latest Videos
Latest News