AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यांचे हात किती बरबटलेत यावरुन दिसून येते…काय म्हणाल्या सारंगी महाजन

आज मी परळी पोलीस स्टेशनला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी नैतिकच्या मुद्द्यावर पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. बीडची सामान्य जनता त्यांचे विमान खाली आणेल असे त्यांच्या मामी सारंगी महाजन यांनी म्हटले होते. हे टोळ भैरव बीडला बिहार करुन टाकणार आहेत अशीही टीका त्यांनी केली आहे.

यांचे हात किती बरबटलेत यावरुन दिसून येते...काय म्हणाल्या सारंगी महाजन
| Updated on: Jan 18, 2025 | 5:44 PM
Share

मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी मस्साजोगमधील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्या भावूक झाल्या. माझी आंबेजोगईच्या जमीनीचा कोर्टातून निकाल लागल्यानंतर त्या जमिनीचे पैसे आल्यास संतोष देशमुख यांच्या मुलांच्या कुटुंबियांच्या शिक्षणासाठी आपण मदत करु असेही सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचे दु:ख आणि माझे दु:ख एकसारखेच आहे. मी सोळा वर्षे एकटी लढत आहे. तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी अख्खे गाव उभे आहे. हाच काय तो फरक आहे. मी ११ वर्षे सामाजिक कार्य करीत आहे. सोळा वर्षांपूर्वीचे माझे दिवस मला आठवले. धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे यांनी कुटुंबाला भेट दिलेली नाही यावरुन त्यांचे या प्रकरणात हात किती बरबटले आहेत हे कळतंय. माझ्या जमीनीच्या व्यवहारात मला फसवले. रजिस्ट्रेशन रद्द करुन तुझे पैसे घेऊन जा, मी ते पैस तसेच कपाटात ठेवले आहेत. खर्च देखील केले नाहीतअसे मी त्याला सांगितले. मी त्याला फोन केला तर तो थेट म्हणाला की मामी तुम्ही फॉलोअप ठेवला नाही. इतकी दिवस आम्ही जमीन सांभाळत आहोत असा तो बोलत होता. मी त्याच्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठी असताना त्याला असे बोलायला लाज नाही वाटत का? तू जमीन सांभाळत होतास तर स्वत:हून पुढे का नाही आलास. सहा फुटाचा कपडा लागतो जाताना इतकी जमीन घेऊन कुठे जाणार आहेस असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी केला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांची कमवलेली इतक्या वर्षांची इज्जत घालविली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.