आमरण उपोषण…उपचारास नकार अन् बोलताना त्रास तरीही मनोज जरांगे पाटील सगेसोयऱ्यांच्या कायद्यावर ठाम
मराठा आरक्षणासाठी सरकार १६ फेब्रुवारीली विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे. मागास वर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून तो स्वीकारून कायदा करण्यासाठी सरकार विशेष अधिवशेन घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटलं जातंय.
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे विशेष अधिवेशन बोलवून स्वतंत्र आरक्षण देण्याची तयारी केल्याची माहिती मिळतेय. मात्र जरांगे पाटील सगेसोयरेच्या अधिसूचनेवरून कायद्याच्या मागणीवर ठाम आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसलेत. तर मराठा आरक्षणासाठी सरकार १६ फेब्रुवारीली विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे. मागास वर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून तो स्वीकारून कायदा करण्यासाठी सरकार विशेष अधिवशेन घेण्याच्या तयारीत आहे. अर्थात मनोज जरांगे पाटील यांची मागणी सगसोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्यावरून कायदा करण्याची आहे. पण सरकार वेगळा आरक्षणाचा कायदा करू शकते. विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना आरक्षण मिळणार? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली

