AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahajibapu Patil : निवडणुकीपूर्वी भाजपनं माझं कंबरडं मोडलं, हे मला... शहाजीबापू पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

Shahajibapu Patil : निवडणुकीपूर्वी भाजपनं माझं कंबरडं मोडलं, हे मला… शहाजीबापू पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

| Updated on: Nov 23, 2025 | 10:32 PM
Share

शहाजीबापू पाटलांनी निवडणुकीपूर्वी भाजपनेच आपले कंबरडं मोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. चंद्रकांत पाटलांचे फडणवीस मुख्यमंत्री असल्याबद्दलचे विधान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मानडेकर यांचा भाजप उमेदवारावर मटका किंग असल्याचा आरोप, कोल्हापुरात चुटकीवाला बाबा सनी भोसलेला अटक, बाळाराजे पाटलांवरील गुंडागर्दीचे आरोप आणि चित्रा वाघ यांच्या मटण खा, कमळ दाबा वक्तव्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकविध घडामोडींनी वातावरण तापले आहे. यात शिंदे सेनेचे आमदार शहाजीबापू पाटलांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले असून, निवडणुकीपूर्वी भाजपनेच आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. शहाजीबापू पाटलांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीपूर्वी भाजपने आपले कंबरडं मोडले हे त्यांना माहीत होते. पराभवानंतरही त्यांनी भाजपवर थेट आरोप करणे टाळले. मात्र, शहाजीबापू पाटलांना पाडण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) मदत केली, हे तालुक्याला माहीत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मित्रपक्ष असल्याने आपण त्यावेळी हे सहन केल्याचे शहाजीबापू पाटलांनी सांगितले. शहाजीबापू पाटलांचा हा आरोप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

Published on: Nov 23, 2025 10:32 PM