Gulabrao Patil : फ्रेश रहा, कधी जीव जाईल… शिंदेंच्या मंत्र्यानं केली राऊतांच्या अजारपणाची टिंगल
गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांच्या आजारपणावरून फ्रेश रहा, जीव कधी जाईल सांगता येत नाही अशी टिप्पणी केली. राऊतांनी रुग्णालयातून फोटो ट्वीट करत हात लिहिता राहिला पाहिजे असे म्हटले होते. पाटलांनी जिजाऊ मातेकडे सत्यानाश करणाऱ्यांना चांगली बुद्धी देण्याची प्रार्थना करत उद्धव ठाकरेंच्या राजकीय भविष्यावरही भाष्य केले.
मंत्री गुलाबराव पाटलांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या आजारपणावरून एक राजकीय टोला लगावला आहे. फ्रेश रहा, जीव कधी जाईल सांगता येत नाही असे विधान पाटलांनी केले. सध्या संजय राऊत हे रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांनी रुग्णालयातून हात लिहिता राहिला पाहिजे असा आशयाचा फोटो ट्वीट केला होता.
याच संदर्भात गुलाबराव पाटलांनी राऊतांच्या आजारपणाची टिंगल उडवल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधींनी नेहमी फ्रेश राहावे, कारण कोणाचा जीव कधी जाईल हे सांगता येत नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. त्यांनी स्वतःचाही उल्लेख करत ही परिस्थिती कोणावरही येऊ शकते असे सूचित केले.
पुढे बोलताना, गुलाबराव पाटलांनी जिजाऊ मातेकडे सत्यानाश करणाऱ्या लोकांना चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना केली. जर अशा लोकांना चांगली बुद्धी मिळाली, तर उद्धव ठाकरे यांचा प्रभाव टिकून राहील, अन्यथा ते पुढच्या वेळी एकटेच राहतील, असे राजकीय भाष्यही गुलाबराव पाटील यांनी केले. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षातील टीका-टिप्पणी अधिक तीव्र झाल्या आहेत.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

