AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'सिंधुताईंबद्दल निघून गेल्या हा शब्द कोणीही वापरु नका, वादळ होत शांत झालं'

‘सिंधुताईंबद्दल निघून गेल्या हा शब्द कोणीही वापरु नका, वादळ होत शांत झालं’

| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 12:22 PM
Share

सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता (Mamata Sapkal)  म्हणाल्या, कृपया आई निघून गेली, असं कुणीही म्हणून नका. ती आमच्यात अजूनही जिवंत आहे आणि यापुढेही राहणार आहे, हे सांगताना त्या अत्यंत भावून झाल्या.

निराधार मुलांना मायेची सावली देणाऱ्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. निधनाने असंख्य अनाथ मुले पोरकी झाली, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटत आहेत. हजारो अनाथांची माय निघून गेली, असं वक्तव्य केलं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता (Mamata Sapkal)  म्हणाल्या, कृपया आई निघून गेली, असं कुणीही म्हणून नका. ती आमच्यात अजूनही जिवंत आहे आणि यापुढेही राहणार आहे, हे सांगताना त्या अत्यंत भावून झाल्या.