Solapur Flood : माझं दप्तर, टिफीन बॅग वाहून गेली, आता… चिमुकलीची सरकारकडे आर्त हाक
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अळजापूर गावाला सीना नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. एका चिमुकलीने तिचे दप्तर आणि जेवणाचा डबा पुरात वाहून गेल्याचे सांगत, सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. पूरग्रस्तांनी भरीव मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या अळजापूर गावामध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले असून, कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अमोल गुरुदास गायकवाड यांच्यासारख्या अनेक नागरिकांनी खत, धान्य, कोंबड्या आणि भांडी गमावली आहेत, तसेच पाच एकर शेतीही पाण्याखाली गेली आहे. पूर ओसरल्यानंतर नागरिक आपल्या उद्ध्वस्त घरांमध्ये परतले आहेत. एका चिमुकलीने तिचे दप्तर, पुस्तके, वही, टिफिन बॅग आणि डबा वाहून गेल्याचे सांगत सरकारने तातडीने मदत करावी अशी आर्त मागणी केली आहे. अळजापूरमधील सुमारे सात ते आठ कुटुंबे या पुरामुळे बाधित झाली आहेत आणि त्यांना शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे.
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
