Special Report | शिवसेनेत वादळ…थेट मातोश्रीशी पंगा !
शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, असं आव्हानच रामदास कदम यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई: शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, असं आव्हानच रामदास कदम यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी अनिल परब यांचा बाप काढतानाच त्यांना हरामखोर म्हणूनही हिणवले. मी किरीट सोमय्यांना कधीच भेटलो नाही. त्यांना कोणतेही कागदपत्रं दिली नाहीत. पण माझ्याविरोधात षडयंत्र रचलं गेलं आहे. त्यामागे अनिल परब यांचा हात असल्याचं सांगतानाच अनिल परब हे साधं निवडून येऊ शकत नाहीत. त्यांनी हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवावं, असा जोरदार हल्ला कदम यांनी चढवला.
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी

