सध्या पाटलांचीच चलती, गौतमी ते जरांगे व्हाया ललित पाटील अशी परिस्थिती; या नेत्यानं लगावला टोला
राज्य विधीमंडळाचं अधिवेशन नुकतंच नागपूर येथे पार पडलं. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चाही झाली आहे. महाराष्ट्रात सध्या पाटलांचीच चर्चा आहे.
नागपूर, २१ डिसेंबर २०२३ : राज्य विधीमंडळाचं अधिवेशन नुकतंच नागपूर येथे पार पडलं. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चाही झाली आहे. महाराष्ट्रात सध्या पाटलांचीच चर्चा आहे. गौतमी पाटील ते मनोज जरांगे पाटील व्हाया ललित पाटील अशी परिस्थिती आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केले आहे. तर दिवाळी पहाटच्या वेळी देखील गौतमी पाटीलचा कार्यक्रम होतोय असा टोलाही अनिल परब यांनी लगावला आहे. दिवाळी पहाटच्या वेळी गौतमी पाटीलचा डान्स ठेवतात. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमात गर्दी आणि मारामारी हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवालही अनिल परब यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपस्थित केलाय. विधानपरिषदेत बोलत असताना अनिल परब यांनी हे वक्तव्य केले आहे.
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?

