महत्वाची बातमी; पिंपरी-चिंचवडकरांवर येऊ शकते पाणीबाणी, काय कारण?
पाऊस नसल्यामुळे शेतीची कामं थांबली आहेत. तर आता अनेक धरणांतील पाण्याच्या पातळीणं तळ गाठायला सुरूवात केली आहे. अनेक धरणांमध्ये पाणी साठाच अल्प झाल्याने उपशावर बंदी घातली आहे.
मावळ (पुणे) : जून महिना आता अर्ध्या अधिक संपला आहे. मात्र अजूनही पावसाचा पत्ता नाही. पाऊस नसल्यामुळे शेतीची कामं थांबली आहेत. तर आता अनेक धरणांतील पाण्याच्या पातळीणं तळ गाठायला सुरूवात केली आहे. अनेक धरणांमध्ये पाणी साठाच अल्प झाल्याने उपशावर बंदी घातली आहे. अशातच आता मावळवासीयांची जीवनवाहिनी आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील पिंपरी-चिंचवड करांना पाणीपुरवठा करणारे पवना धरणातून चिंता आणणारी बातमी आहे. येथे पाणलोट क्षेत्रात केवळ 19.91टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ज्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. तर मावळच्या पवना धरणात मागील वर्षी हाच साठा 21 टक्के इतका होता. तर आता केवळ 19.91 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर शिल्लक पाणीसाठा हा जुलै महिन्या अखेरी पर्यंत पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्याने काढला आहे. जर पाऊस लांबला तर हा पाणी साठा कमी पडू शकतो आणि नागरिकांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते असेही विभागानं सांगितलं आहे.
Published on: Jun 18, 2023 12:51 PM
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
