AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thackeray Brothers : 96 लाख मतांची चोरी अन् चोरासकट चोरी पकडली, ठाकरे बंधूंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Thackeray Brothers : 96 लाख मतांची चोरी अन् चोरासकट चोरी पकडली, ठाकरे बंधूंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

| Updated on: Oct 21, 2025 | 11:08 AM
Share

राज ठाकरे यांनी ९६ लाख बोगस मतांचा आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही भाजपवर निशाणा साधला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना सुरसुरी फटाका संबोधत अॅटम बॉम्बने उत्तर देण्याचा इशारा दिला. तर मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंच्या आरोपांच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज ठाकरे यांनी ९६ लाख बोगस मतांचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्षांनी केलेल्या या दाव्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही सत्ताधारी पक्षावर “चोरासकट चोरी पकडली” अशी टीका केली आहे. या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे, त्यांनी ठाकरेंना “सुरसुरी फटाका” संबोधत “अॅटम बॉम्ब”ने महापालिकेत उत्तर देणार असल्याचे म्हटले. महायुती जनमताच्या पाठिंब्यावर जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंना लक्ष्य करत, लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे आरोप का केले नाहीत, असा सवाल केला. मालेगाव, भिवंडी, नळबाजार आणि मालवणीसारख्या भागांमध्ये मतदार याद्या तपासण्याचे आव्हान त्यांनी राज ठाकरेंना दिले. महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली असून, राणे यांनी याला शहरी नक्षलवादाची भाषा म्हटले आहे. निवडणूक आयोगाला घेरण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे, ज्यात मनसेचा मेळावा, उद्धव ठाकरेंची सभा आणि १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा यांचा समावेश आहे.

Published on: Oct 21, 2025 11:08 AM