Uddhav Thackeray : या लोकांना आधी कोण ओळखत होतं? यांना शिवसेनेमुळं ओळख.. ठाकरेंचा रोख कुणावर?
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या योगदानावर भर दिला, या लोकांना ओळख शिवसेनेनी दिली, यांना आधी कोण ओळखत होतं, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांचा उल्लेख करत, त्यांनी सध्याच्या सरकारवर शेतकरी कर्जमाफी आणि मदत निधीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
उद्धव ठाकरे यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या लोकांना ओळख शिवसेनेनी दिली, यांना आधी कोण ओळखत होतं? असा सवाल करत त्यांनी शिवसेनेच्या योगदानावर प्रकाश टाकला. आम्ही हिंदुस्थानात हिंदू आहोत आणि महाराष्ट्रात मराठी असे सांगत त्यांनी बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पुनरुच्चार केला. ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या कर्जमुक्तीचे स्मरण करून दिले. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी पश्चिम विदर्भापर्यंत नेल्याचे आणि संभाजीनगरमध्ये केलेल्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला. सध्याच्या सरकारवर टीका करताना, त्यांनी पीकविम्याचे अत्यल्प पैसे आणि एक हजार रुपयांच्या मदतीची थट्टा केली. बाळसाहेबांचा जन्म पुण्यातील असला तरी, त्यांनी मुंबईला अदानींच्या घशात घातले नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
Published on: Jan 10, 2026 01:33 PM
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
