AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीत पैशांचा धमाकुळ सुरु! उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

निवडणुकीत पैशांचा धमाकुळ सुरु! उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

| Updated on: Jan 13, 2026 | 2:18 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील निवडणुकीत पैशांच्या गैरवापराचा तीव्र निषेध केला आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये उमेदवारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईची अस्मिता राखण्यासाठी आणि गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी सरिताताईंना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांच्या गैरवापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, मतदानासाठी दिल्या जाणाऱ्या पैशांच्या आमिषाला बळी पडू नये. ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सरिताताई नामक उमेदवाराचा उल्लेख करत, त्यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली.

ठाकरे यांनी आरोप केला की, गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा धुमाकूळ सुरू आहे. ठाण्यात मनसेच्या उमेदवारांनाही निवडणूक न लढण्यासाठी एक ते पाच कोटी रुपयांच्या ऑफर्स दिल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले. जे लोक काम करतात ते काम घेऊन लोकांसमोर येतात, पण ज्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, ते पैसे वाटतात, असे ठाकरे म्हणाले. असे पैसे वाटताना दिसल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुंबईची अस्मिता टिकवण्यासाठी कर्तव्याला चुकू नका, असे आवाहन करत, मुंबई आपलीच आहे ती आपल्या ताब्यात ठेवा, असे ते म्हणाले.

Published on: Jan 13, 2026 02:18 PM