“…तर शिंदे सरकार कोसळणारच”, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विधान
घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी शिंदे सरकारच्या भविष्याबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.
प्रदीप कापसे, मुंबई : अपात्र आमदार आणि सरकारच्या भविष्याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी महत्वाचं विधान केलंय. 16 आमदार अपात्र व्हायला हवेत. यामध्ये आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचंही नाव आहे. जर ते अपात्र झाले तर मग सरकारचं कोसळेल, असं बापट म्हणालेत. सुप्रीम कोर्टानं 27 तारखेला निकाल देणं अपेक्षित आहे, असंही बापट यांनी म्हटलं आहे. काल शिवसेनेला मिळलेली परवानगी ही घटनेला धरून आहे. जर शिंदेगटानं कोर्टात जरी याचिका दाखल केली तरी हायकोर्टाचं निरीक्षण नोंदवलं जातं. कधीकधी हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्ट फिरवतं मात्र कालचा निर्णय घटनेला धरून आहे, असंही बापट म्हणालेत.
Latest Videos
Latest News