मुंबईत उन्हाच्या काहिलीनंतर बरसल्या अवकाळीच्या धारा
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका मुंबईमध्ये वाढलेला असतानाच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. याच गारव्याचा अनुभव मुंबईकरांना देखिल आज मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका मुंबईमध्ये वाढलेला असतानाच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. तर उन्हाचा तडाखा त्यानंतर आता अवकाळी पाऊस यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे देखील आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. तर पुढील काही दिवस पावसाच्या सरी बरसत राहतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
