मुंबईत उन्हाच्या काहिलीनंतर बरसल्या अवकाळीच्या धारा
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका मुंबईमध्ये वाढलेला असतानाच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. याच गारव्याचा अनुभव मुंबईकरांना देखिल आज मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका मुंबईमध्ये वाढलेला असतानाच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. तर उन्हाचा तडाखा त्यानंतर आता अवकाळी पाऊस यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे देखील आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. तर पुढील काही दिवस पावसाच्या सरी बरसत राहतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

